नमस्कार मित्रांनो आणि भगिनीनो आज आंपण आफ्णार आहोत की आपण आपल्या घरावर सातत्याने कुरबुरी होत असतील सतत भांडणे होत असतील संताप होत असेल कायम घरामध्ये नकारात्मक वातावरण राहत असेल तर तुम्ही या उपायाने आपले त्रास बरे करू शकता. तर य सर्व गोष्टी दूर करण्यासाठी घरातील कर्त्या स्त्रीने किंवा कर्त्या पुरुषाने दररोज गायत्री मंत्राचा जप करावा. जर गायत्री मंत्राचा जप करणे शक्य नसेल तर ‘ओम ह्रिम सूर्याय नमः ‘ या मंत्राचा १०८ वेळा म्हणजे एक माळ जप करावा. तुम्हाला दिसून येईल की पहिल्याच दिवसापासून घरातील भांडणे, अशांती, कचकच इत्यादी नकारात्मक गोष्टी कमी होऊ लागल्या आहेत.

मित्रांनो आणि भगिनीनो तसेच या मंत्राचा जप आपण सकाळी सकाळी करायचा आहे. आणि रात्री झोपताना किमान एकदा न चुकता रामरक्षा नक्की म्हणा. राम रक्षेचा एक पाठ नक्की करा. तुमच्या घरात शांती तसेच जादू सारखे निर्माण होईल. आपल्या घरात जी लहान लहान मुले आहेत त्यांना आता पासून राम रक्षा म्हणायला शिकवा. राम रक्षा रोज म्हटलं तर मुलांची बुध्दी तल्लख बनते. ते जे काही वाचतील लिहितील अध्ययन करतील ते दीर्घ काळ त्यांच्या स्मरणात राहते.

याचा हा सर्वात मोठा फायदा आहे. अनेक लोकांच्या घरात वास्तू दोष असतात. भांडणे लागतात. विनाकारण एखादा विषय वाढवला जातो. अशा प्रकारे तुमच्या घरात वास्तू दोषांमुळे जर हे घडत असेल अत्यंत साधा सोपा उपाय आहे. आपल्या देव घरात जो शंख आहे शंखामध्ये जेव्हा आपण सकाळी देवपूजा करतो. तेव्हा या शंखतील पाणी घरात शिंपडत जा. घराचा मुख्य दरवाजा असेल किंवा घरातील इतर ज्या जागा आहेत.

तसेच बाथरूम आणि टॉयलेट सोडून थोडे थोडे जल घरात शिंपडल्याने वास्तूतील बरेचसे वास्तुदोष दूर होतात. जर एखादी अदृश्य वाईट शक्ती तुमच्या घरात संचार करत असेल वावरत असेल तर या वाईट शक्ती चा नाश सुद्धा लवकर होतो. खूप प्रभावशाली असा हा उपाय आहे. पैशाला पैसा न लागणे पैसा येतो मात्र तो टिकून राहत नाही. एक प्रकारचं मानसिक दडपण असेल नेहमी आजारपण आहे. पती पत्नी मध्ये सतत खटके उडतात. यासाठी खूप प्रभावशाली उपाय आहे.

आपल्यावर घरामध्ये खूपच जर कर्जाच खूप डोंगर आहे. कर्ज फिटतच नाही. घरातील एका व्यक्तीला व्यसन लागले आहे. दारू किंवा कोणताही व्यसन असू दे जुगाराचे आहे. हे व्यसन सुटत नाही. नेहमी चिंता सतावत राहते. भीती वाटते. तर अशा वेळी एक कॉमन गोष्ट लक्षात ठेवा. या सर्वाचा प्रमुख कारण आहे. वास्तु दोष. हा वास्तू दोष कोणता आहे. हे प्रत्यक्ष त्या घरास भेट दिल्याशिवाय सांगता येत नाही.

कोणत्याही स्वरूपाचा वास्तू दोष दूर होण्यासाठी एक तर महाशिवरात्रीच्या दिवशी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान असते किंवा कोणत्याही सोमवारी सूर्योदय होण्यापूर्वी किंवा सूर्य उगवण्यापुर्वी शिवलिंगाची आपल्या देव घरात स्थापना करा. किंवा आधीच शिवलिंग असेल तर या शिवलिंगाची सूर्योदय होण्यापूर्वी आपण पूजा करण्यास प्रारंभ करायचं आहे. शोडोशोपाचार अगदी विधिवत पूजा करायची आहे.

तसेच बेल वाहायला विसरू नका. ओम नमो भगवते पर्धेश्वराय सांबशिवाय पुन्हा एकदा ऐका अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे. या मंत्राचा जप १०८ वेळा जर आपण रुद्राक्षाच्या माळे वर केला. सलग एक महिना म्हणजे ३० दिवस हार आपण जप केला तर घरातील मोठ्यातील मोठा वास्तू दोष कोणतीही मोडतोड न करता निघून जातो. जे काही कर्जाचा डोंगर, व्यसनाधीन व्यक्ती, शारीरिक अस्वास्थ्य असणे सर्व निघून जाऊ शकतो. पैसा टिकून राहू शकतो.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धा-र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध-श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *