नमस्कार मित्रांनो.. Marathi Duniya.. या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! मित्रानो आपल्या हिंदू धर्मात तुळशीला फार महत्व दिले जाते. तुळशीचे जितके धार्मिक महत्व आहे तितकेच वैज्ञानिक गुणही आहेत. तुळशीचे बरेच फायदे त्यामुळे प्रत्येक जण दारात एकतरी तुळशीची कुंडी ठेवतोच.

आपल्या धर्म ग्रंथांमध्ये तुळशीचे अनेक उपाय सांगितले आहेत. तुळशीमुळे आपण कितीतरी रोगांपासून सुटका मिळवू शकतो तसेच कितीतरी बाधांपासून सुटका मिळवू शकतो.

मित्रानो तुळशीतून सकारात्मक ऊर्जा उत्सर्जित होत असते. जो नियमित तुळशी पूजन करतो त्यांना हि सकारात्मक ऊर्जा नक्कीच जाणवत असेल. म्हणून दररोज सकाळी स्नान झाल्यानंतर एक तांब्याभर पाणी तुळशीला अर्पण करावे.

ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करता करता तुळशीला 5, 7, 11, 21, 108 आपल्याला जितक्या शक्य होतील तितक्या प्रदक्षिणा घालाव्यात. असे केल्याने तुळशीमधून निघणारी सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते.

असे म्हणतात कि घरात काही अनिष्ट घटना घडणार असेल तर तुळशी माता ते संकट स्वतःवर घेते व आपले संरक्षण करते. आपण खूप देखभाल करून देखील तुळस कोमेजून जात असेल तर समजून जावे कि आपल्यावर किंवा आपल्या कुटुंबातील एखाद्या सदस्यावर बुध ग्रहाची छाया आहे. म्हणूनच तुळस वेळोवेळी कोमेजून जाते. तुळस जर कोमेजून गेली असेल तर अशा वेळी ती काढून तिचे विसर्जन करावे आणि दुसरी तुळस आणून लावावी.

तुळशीच्या पानांचे फार महत्व आहे. तुळशीची फक्त चार पाने रात्री झोपताना आपल्या उशीखाली ठेवून झोपावे किंवा जवळ घेऊन झोपावे. हा उपाय तुम्हाला सलग 43 दिवस करायचा आहे. जर रात्री शांत झोप लागत नसेल तर पानांमधून निघणाऱ्या सकारात्मक ऊर्जेमुळे आपल्याला शांत झोप लागेल. वाईट स्वप्न पडणार नाहीत. जर आपल्याला भीती वाटत असेल, एखाद्या गोष्टीचे दडपण असेल तर ती भीती आणि दडपण देखील नष्ट होईल. तसेच आपले दुर्भाग्य सौभाग्यात बदलेल.

जर आपल्याला आपल्या प्रत्येक कार्यात यश हवे असेल तर तुळशीच्या मुळाचा देखील आपण एक उपाय करू शकतो. त्यासाठी तुळशीच्या मुळाला आमंत्रण देऊन घरी आणावे. ती मुळी घरी आणून गंगेच्या पाण्याने स्वच्छ करावी. नंतर ती मुळी एका पिवळ्या कापडात बांधून पिवळ्या दोऱ्याने आपल्या उजव्या हातात गुरुवारी बांधावी. हि मुळी अभिमंत्रित करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा.

मित्रांनो या उपायामुळे आपल्या जीवनातील सर्व आर्थिक व भौतिक समस्या असतील त्या दूर होतील. सर्व कार्य सुरळीत व विना अडथळ्याची पार पडतील. दृष्ट लागली असेल, तब्येत साथ देत नसेल, व्यवसाय चालत नसेल, नोकरीत उपयश येत असेल तर घरातील कोणत्याही सदस्याला 7 काळी मिरी, व 7 तुळशीची पाने घेऊन आपल्या अंगावरून 7 वेळा उतरवायला लावावी. हा उतारा करताना ओम नावाचा अखंड जप सुरु ठेवावा.

त्यानंतर हे काळीमिरीचे दाणे चावून बाहेर टाकावेत व तुळशीची पाने खाऊन घ्यावीत. नंतर एक स्वच्छ कापड घेऊन झोपून तळ पायावरून त्या कपड्याने 7 वेळा उतारा करावा. हा उपाय केल्याने आपल्यावर कोणी काही करणी केली असेल, तंत्र मंत्रांचा प्रभाव असेल, आपले दुर्भाग्य असेल ते सर्व निघून जाईल व आपल्या जीवनात सकारात्मकता येईल.

मुख्य दाराच्या दोन्ही बाजूला तुळस लावावी. असे केल्याने घरातील धन धान्यात वाढ होते. पैशात बरकत येते. घराच्या दोन्ही बाजूना तुळस लावल्यास घरात सकारात्मक ऊर्जेचा वास कायम राहतो. नकारात्मक ऊर्जा नावाला देखील उरत नाही.

सकाळ संध्याकाळ तुळशी पुढे शुद्ध तुपाचा दिवा जरूर लावावा. यामुळे आपल्यावर देवी लक्ष्मीची कृपा होते. जर मुले जास्त हट्टी असतील आपले ऐकत नसतील तर रविवार सोडून इतर सर्व वारी मुलांना पूर्वेकडे ठेवलेल्या तुळशीची चार पाने खायला द्यावीत. यामुळे मुलांमधील हट्टीपणा दूर होऊन मुले आपले म्हणणे ऐकायला लागतील.

घरात जर मुलीचे लग्न जमत नसेल तर अग्नेय दिशेला तुळशीची कुंडी ठेवून त्या मुलीला दररोज एक तांब्या पाणी अर्पण करायला सांगावे. असे केल्याने लवकरच मुलीला योग्य वर मिळेल.

जर घरात नेहमीच भांडण, वादविवाद होत असतली तर आपल्या किचनच्या खिडकीत तुळशीची कुंडी ठेवावी. असे केल्याने घरात नेहमी प्रेम आणि सामंजस्य टिकून राहील.

तुळशीची नावे दररोज जपल्यास आपल्यावर कोणत्याही प्रकारचे संकट येत नाही. दररोज पाच मिनिट का होईना घरातील सदस्यांनी तुळशीसमोर उभे राहावे. तिचे पूजन व नामस्मरण करावे. लहान मुलांना दररोज तुळशीची पाने खायला दिल्यास त्यांची बुद्धिमत्ता तीव्र होते.सोबतच पोटा संबंधी काही विकार असतील तर ते देखील नष्ट होतात. मुलांना तुळशीच्या आसपास अभ्यासाला बसवावे. यामुळे कोणतीही गोष्ट मुलांच्या लवकर लक्षात राहते. त्याबरोबर स्वास्थ्य संबंधी देखील फायदा होतो.

तसेच देवी देवतांची कृपा देखील आपल्यावर होते. गळ्यात तुळशी माळा घातली तर आपल्या आरोग्य संबंधी सर्व अडचणी दूर होतात. तसेच देवी देवतांची कृपा सदैव आपल्या सोबत राहते. आपल्यावर कोणाची वाईट दृष्ट पडत नाही. मित्रानो हे उपाय करून आपण आपल्या जीवनातील सर्व नकारात्मक ऊर्जा कायमची नाहीशी करू शकतो. व आपले दुर्भाग्य सौभाग्यात बदलू शकतो.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *