काही व्यक्ती आपल्या घरातील अशा काही गोष्टी इतरांना सांगतात त्या सांगितल्या नाही पाहिजे कारण काही व्यक्तींचा स्वभाव असतो एखाद्याचे वाईट झाले हे रडून ऐकायचे आणि इतरांना हसत असत सांगायचे तर काही व्यक्तीं आपल्या कमजोरीचा फायदा सुद्धा घेण्याची शक्यता असतेत्यामुळे आपण अशा काही गोष्टी असतात ज्या इतरांना सांगितले गेले नाही पाहिजे .

चला तर अशा कोणत्या गोष्टी आहेत हे आपण जाणून घेऊया
आपला अपमान झालेला असेल तर हे कोणाला सांगू नये आपल्या आयुष्यात अशा काही घटना घडतात त्यामुळे आपला अपमान होत असतो अशा गोष्टी गुप्त ठेवण्यात जर का आपण त्या गोष्टी इतरांना सांगितल्या तर ते आपल्यावर हसत राहतील .

तसेच इतरांना आपल्या आयुष्याबद्दल काहीच देणे घेणे नसतेत्यामुळे त्यांना आपला झालेला अपमानाबद्दल सांगू नये .

दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरातील गुप्त गोष्टी इतरांना सांगू नये आपल्या घरातील झालेले भांडण इतरांना सांगू नये कारण घरात जास्त प्रमाण तेढ निर्माण करण्याचे काम घराच्या बाहेरील लोक करत असतात .

तर काही प्रमाणात तेच लोक जबाबदार असतात आपल्या घरात फूट पाडण्यासाठी इतरांना कधीच चांगल्या गोष्टी पचवत नसतात .

आपल्या मनातील दुःख कधीही इतरांना सांगू नये . काहीजणांना वाटत असते आपण आपले छोटे अडचणी आणि दुःख इतरांना सांगितले तर आपले मन मोकळे होईल . आपण या छोट्याशा अडचणी आणि दुःख इतरांना सांगितल्यास आपण आपली अडचण तयार करून बसतो इतर लोकांना आपल्या कमजोरी बद्दल माहिती मिळवून जातील आणि ते लोक त्याचा फायदा घेऊ शकतात त्यामुळे आपली दुःख बद्दल जास्त कोणाला सांगू सांगत बसू नये इतरांना सांगितल्यामुळे आपले दुःख कमी होत नाही .

त्यामुळे कारण कोणते आहे हे समजून घ्या आणि त्यावर काम करा .

पुढील गोष्ट म्हणजे आपले झालेले नुकसान कोणालाही सांगू नये बऱ्याच वेळेस अशा अडचणी येतात त्यावेळेस आपल्या हातात आधीच पैसा राहत नाही त्यामुळे आपल्याला गरिबी येते अशावेळी आपली आर्थिक अडचण इतरांना सांगत बसू नये त्यामुळे इतर लोक तुम्हाला मदत करणार नाहीत असेच तुम्हाला कमी लेखतील . सध्याच्या युगात ज्याच्याकडे पैसा आहे त्याला हुशार आणि बलवान समजले जाते याला सर्वजण भाव देतात जर पैसा नसेल तर कोणीच मानसन्मान देणार नाही .

त्यामुळे आपल्याकडे असलेली आर्थिक अडचण कोणाला सांगू नका सहजरित्या होणारे काम सुद्धा होणार नाही .

एखाद्या व्यक्तीने आपल्या वैवाहिक जीवनातील गोष्टी कधीही कोणाशीही शेअर करू नये .पती-पत्नी मधील संभाषण स्वतःपुरते मर्यादित असावी . विशेषता जेव्हा तुम्ही आणि तुमच्या जोडीदारांमध्ये काही प्रकारचे भांडण होत असेल .

आपल्या कामातील महत्त्वाच्या गोष्टी आणि योजना इतर कोणत्याही व्यक्तीला सांगू नयेत त्यामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी नुकसान सहल करावी लागू शकते प्रत्येक व्यक्तीची काही ना काही कमकुवत आणि मजबूत बाजू असते तुमची कमकुवत बाजू लोकांसमोर कधीही उघड करू नका त्यामुळे व्यक्ती इतरांच्या नजरेत कमकुवत बनतो . अशा परिस्थितीत लोक तुमच्या कमकुवतपणाचा कधीही फायदा घेऊ शकतात व्यक्तीमध्ये काही नकारात्मक गोष्टी देखील घडतात या गोष्टी माणसाच्या स्वभावात असतात .

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *