मित्रांनो, आपण सर्वजन स्वामींचा आशीर्वाद मिळावा म्हणून आपण स्वामींची सेवा करत असतो. पण काहीजण सेवा करताना मनात इतर वेगवेगळे भाव ठेऊन सेवा करत असतात. म्हणजेच श्री स्वामी समर्थ यांची सेवा करताना इतरत्र आपले ध्यान असणे आणि आपण स्वामीं सेवा करत होतो असे दाखवणे या अश्या चुकीच्या सवयीमुळे स्वामींचा आपल्याला आशीर्वाद मिळत नाही.

स्वामींना आवडणाऱ्या काही गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. ज्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत जेणे करून स्वामींची कृपा आपल्यावर झाली पाहिजे. अश्या काही गोष्टी असतात त्या चुकूनही करू नका त्यामुळे स्वामींची कृपा दृष्टी आपल्यावर राहणार नाही. अश्या कोणत्या गोष्टी आहेत त्या करणे योग्य नाहीत ते आज आपण पहाणार आहे.

आपण केलेली स्वामींची सेवा याचा प्रचार करत राहू नये. स्वामींबद्दल चुकीची माहिती कोणालाही सांगू नये. आपल्या पासून स्वामींना फक्त हवे असते ते म्हणजे मनापासून केलेली श्रद्धा आणि मनापासून केलेली आराधना या गोष्टी स्वामींना हव्या असतात. स्वामींना कुठल्याही श्रद्धेचा देखावा आवडत नाही म्हणून त्यांच्या श्रद्धेचा देखावा चुकूनही करू नये. आपण स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी त्यांच्या आवडत्या काही गोष्टी केल्या पाहिजेत. चला तर त्या कोणत्या गोष्टी आहेत ते जाणून घेऊया.

यातील पहिली गोष्टी आहे सगुण उपासना म्हणजे या उपासनेमध्ये कोणतीही मनात इच्छा न ठेवता फक्त स्वामींची आराधना करणे. श्री स्वामी समर्थ या नावाचा जप करणे हा जप कितीही वेळ केलात तरी चालेल. ही उपासना करण्यासाठी कोणतीही अपेक्षा मनात नसणे व मनोभावाने ही सेवा करणे आणि सेवेत खंड पडू न देता नित्य नेमाने सेवा करत रहा.

दुसरी उपासना म्हणजे अन्नदान, अन्नदान हे एक श्रेष्ठ दान आहे. जे गरजू लोक आहेत त्यांना आवश्य अन्नदान करावे. बऱ्याच लोकांना रोज अन्नदान करणे जमत नसेल तर महिन्यातून एकदा तरी अन्नदान करावे किंवा वर्षाततून एकदा केले तर चालेल पण अन्नदान जरूर करावे.

जर अन्नदान आपल्याकडून होत नसेल तर कमीत कमी एक गरजूला काहीतरी मदत आवश्य करावे ती कोणत्याही स्वरूपाची मदत असुद्या तरी चालेल. तिसरी गोष्ट म्हणजे दत्त महाराजांचे नामस्मरण करणे. तुम्हाला माहिती असेल दत्त महाराजांचे रूप म्हणजे श्री स्वामी समर्थ आहेत.

त्यामुळे दत्त महाराजांचे नामस्मरण करत जावे फक्त दत्त महाराजांचे नव्हे तर स्वामींचे नामस्मरण करत जावे. स्वामींचे किंवा दत्त महाराजांचे नामस्मरण करत जावे ते अधूनमधून कधी सोडून देऊ नये. यापुढील गोष्ट माणूस जोडण्याची आवड जे व्यक्ती स्वामींच्या मठात जातात किंवा केंद्रात जातात त्यांना माहिती असते की माणसे कशी जोडायची असतात.

त्यांना माहिती असते की स्वामींची सेवा केल्याने किती चांगल्या गोष्टी आयुष्यात येतात हे सगळ्यांचे मनोबल त्याच्यात आलेले असते. आणि असे लोक लवकर माणसे जोडतात. पुढील गोष्ट म्हणजे ज्या त्या परिस्थितीत समाधानी राहणे. व जे काही देवांनी दिले आहे त्यात समाधानानी राहण्याची सवय करून घ्या. विनाकारण दुसऱ्याला मिळणाऱ्या गोष्टीवर मनात कडूपणा अणू नये. किंवा देवाने आपल्याला काहीच दिले नाही असे सतत बोलत बसू नये.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *