नमस्कार मित्रांनो..Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! श्री स्वामी समर्थ.. मित्रांनो.. एकदा गंगेला विचारण्यात आलं तुझ्या पाण्यात अंघोळ केली की सर्व पाप धुतली जातात, त्या सर्व पापांचं तू काय करतेस. ती म्हणाली मी समुद्रात नेऊन टाकते. समुद्राला विचारण्यात आलं तू त्या पापांच काय करतोस? त्यावर समुद्र म्हणाला की मी ते ढगात नेऊन टाकतो. ढगाला विचारलं तू काय करतोस त्या पापांचं? ढग म्हणाला मी पावसाच्या स्वरूपात पुन्हा त्यांच्या घरावर नेऊन टाकतो.

लक्षात ठेवा कालचक्र ही असंच आहे. तुम्ही जे करणार तेच तुम्हाला परत मिळणार. भगवंत जसा ठेवेल तसंच राहण्याचा प्रयत्न करा, समाधानी रहा आणि आयुष्यात पुण्य कर्म करत रहा. कारण जसं तुम्ही जे करणार तेच तुम्हाला परत मिळणार हे कालचक्र आहे. ते कुणालाही सुटलेलं नाही.

तुम्ही जितकी पुण्य कर्म कराल तितकं तुमच्या आयुष्यात चांगलेच होईल आणि तुम्ही जितकी वाईट कर्म कराल ते दुष्कृत्य तुमच्यावरच पडणार आहे. त्यामुळे भगवंत जसा ठेवेल तसंच राहण्याचा प्रयत्न करा समाधानी रहा. ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असू द्यावे समाधान श्री स्वामी समर्थ.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *