नमस्कार मित्रांनो.. Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! मित्रांनो तेल लावल्यानंतर, स्मशानातून आल्यानंतर, केस कापून आपल्यानंतर, जोपरेंत मनुष्य स्नान करत नाही टोपरेंत तो चांडाळ बनून असतो म्हणून स्नानानंतर तेल लावू नये ते आधी लावावे. त्याचप्रमाणे पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून दाढी किंवा केस कापावेत ह्यामुळे आयुष्य वाढते. केस कापल्यानंतर किंवा दाढी केल्यानंतर स्नान न करणे हे आयुष्याचा नाश करणे आहे.
तसेच निर्वस्त्र होऊन स्नान करणे शास्त्र संमत नाही, पुरुषाने नित्य मस्तकावर पाणी घेऊनच स्नान करावे. मस्तकावरून स्नान करूनच देवकार्य तसेच आपले दररोजचे कार्य करावे. इतरांच्या ठिकाणी श्रद्धाचे जेवण घ्यावे लागते, आपण ते नाकारू शकत नाही श्राद्धाच्या जेवणाने दोष लाभतात. आपण जेवण घेऊन घरी आल्यानंतर मात्र डोक्यावरून पाणी घेऊन स्नान केले कि दोष जातात हेही आपल्या धर्मात सांगितले आहे. संसारी माणसाने किमान दोन वेळा जरूर स्नान करावे.
पहिले स्नान सूर्योदयापूर्वी तर दुसरे स्नान सूर्यास्तानंतर करावे. स्नानाच्या वेळी दक्षिण दिशेला तोंड असू नये ह्याची प्रेत्येकाने दक्षता घ्याला हवी. गंगेचे पाणी असे आहे कि ज्यामुळे आपले पापांपासून मुक्ती मिळते असे म्हटले आहे. जर प्रेत्येक्ष स्नान करता आले नाही तरी गंगेचे स्मरण जरी केले तरी चालते. तर मित्रांनो ह्या होत्या काही शास्त्रात सांगितलेल्या स्नान संबधी माहिती आजच्या लेखात आपण जी सांगितली आहे.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!