नमस्कार मित्रांनो.. Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! असे अनेक लोक असतात जे आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी कर्ज घेतात. ज्या लोकांनी कमी रक्कमेचे कर्ज घेतले आहे ते तर सहज आपले कर्ज फेडण्यात यशस्वी होतात पण ज्यांनी मोठ्या रक्कमेचे कर्ज घेतलेले असते त्यांना कर्ज फेडण्यासाठी समस्यांचा सामना करावा लागतो. तर काही लोक असे असतात जे एका मागून एक कर्ज घेत राहतात आणि मंग कर्ज पेलवेनासे होते आणि ते परत फेडण्याचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये नसते.

अशा प्रकारचे लोक इच्छा असून देखील कर्ज फेडू शकत नाहीत. शास्त्रा मध्ये कर्ज घेणे आणि देणे यासंबंधी उल्लेख आहे आणि शास्त्रामध्ये लवकर कर्ज फेडण्यासाठी उपाय सुचवले आहेत आणि या उपायांच्या मदतीने कोणीही व्यक्ती कमीवेळात कर्जा पासून मुक्ती मिळवू शकतो. चला तर मग कर्ज मुक्तीसाठी 6 प्रभावी उपाय जाणून घेऊयात.

गायत्री मंत्र जप – मित्रांनो, कर्ज मुक्तीच्या या उपायांमध्ये आपल्यास पाच रंगाचे गुलाब आणि एक पांढरे वस्त्र यांची आवश्यकता आहे. हे वस्त्र दिढ मीटर घ्यावे. ज्यानंतर आपण सगळे गुलाब या कपड्यामध्ये ठेवावे आणि गायत्री मंत्राचा 21 वेळा जप करावा.जप करता करता आपण या कपड्यास बांधावे.

जप पूर्ण झाल्यावर या कपड्याने बांधलेले गुलाब कोणत्याही नदी किंवा वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे. हा उपाय केल्या नंतर काही दिवसातच आपल्यावरील कर्ज कमी होत असल्याचे तुम्हाला दिसून येईल. तर ज्या लोकांवर कर्जाचे ओझे अधिक आहे त्यांनी मंत्र जप दररोज करणे फायदेशीर ठरेल.

नारळ आणि काळा धागा – मित्रांनो, कर्ज मुक्ती मिळवण्यासाठी दुसरा उपाय करण्यासाठी आपल्याला काळा धागा आणि नारळ यांची गरज लागेल. हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या उंची एवढा एक काळा धागा लागेल. या धाग्याने आपली उंची मोजल्या नंतर हा काळा धागा नारळावर गुंडाळावा. यानंतर या नारळाची पूजा करा आणि पूजा झाल्यानंतर हा नारळ नदीमध्ये प्रवाहित करावे. परंतु लक्षात ठेवा हा उपाय फक्त शनिवारच्या दिवशी करावा.

मसूर डाळ – मित्रांनो, मसूर डाळ देवास अर्पण केल्याने देखील कर्ज कमी होते. हा उपाय करण्यासाठी सोमवार अथवा मंगळवारी शिवलिंगावर मसूर डाळ अर्पण करावी. डाळ अर्पण करतांना ‘ॐ ऋणमुक्तेश्वर महादेवाय नम:’ यामंत्राचा जप करत राहावे.

मोहरीचे तेल (राईचे तेल) – मित्रांनो, शनिवारच्या दिवशी आपण एक मातीच्या दिव्यामध्ये मोहरीचे तेल टाकावे आणि नंतर हा दिवा वरून व्यवस्थित झाकावा. या दिव्याला झाकल्यानंतर आपण नदी किनारी जाऊन तेथे एक खड्डा बनवून या दिव्यास त्या खड्ड्यामध्ये पुरावे. हे सगळे केल्यानंतर मागे न पाहता सरळ आपल्या घरी यावे.

नारळ आणि चमेली तेल – मित्रांनो, आपण चमेलीच्या तेलामध्ये शेंदूर मिक्स करून एक टिळा बनवावा आणि नंतर या टिळ्याने नारळावर स्वास्तिक बनवा. त्यानंतर हा नारळ मारुतीला अर्पण करावा. या नारळ सोबत मारुतीला नैवेद्य द्यावे आणि सोबत ऋणमोचक मंगल स्तोत्र वाचावे. हा उपाय केल्यावर आपल्याकडे धन येण्यास सुरुवात होईल ज्यामुळे आपण कर्ज परत करू शकता.

सात गुरुचरित्र पारायण करावे – मित्रांनो, त्वरित कर्ज मुक्ती होण्यासाठी गुरुचरित्र पारायण वाचन करावे. जे पारायण अगदी मन लावून व श्रद्धेने करावे. त्याचे नियम काटेकोरपणे पाळावेत. हे सहा उपाय केले तर लवकरात लवकर तुमची कर्जमुक्ती होईल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *