नमस्कार मित्रांनो.. Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी असतात. त्या अडचणी कशा प्रकारे दूर कराव्यात यासाठी शास्त्रात प्रत्येक समस्येवर उपाय देण्यात आले आहे. प्रथम उपाय असा की स्वताच्या मेहनतीने आणि समजूतदारीने तुमची अडचण दुर करण्याचा प्रयत्न करा. तरी देखील समस्येच निवारण होत नसेल तर दुसरा उपाय आहे धार्मिक कार्य करा.

आपल्याला जिवनात प्राप्त होणारे फळ हे आपल्या कर्माचे प्रतिफळ असते. शास्त्रानुसार पुढील पक्षांना आणि प्राण्यांना रोज धान्य टाकल्यास अडचणी दूर होण्यास मदत होते. गाय, पक्षी, कुत्रा आणि मासा यांना रोज धान्य टाकल्यास आपल्या जीवनातील समस्या दुर होण्यास मदत होईल

एखाद्या व्यक्तीने जर गायीला रोज पोळी खाऊ घातली तर जोतिष्य ग्रहाचा दोष नाहीसा होण्यास मदत होते.

पक्षाना धान्य टाकल्याने आर्थिक समस्यांचे निवारण होण्यास मदत होते. व्यावसाय करणार्‍या व्यक्तींनी विशेषकरून रोज पक्षांना धान्य टाकले पाहिजे.

जर एखादी व्यक्ती शत्रुच्या त्रासापासून त्रस्त असेल तर अशा व्यक्तींनी कुत्र्याला रोज पोळी खाऊ घातल्याने शत्रुची भिती राहत नाही.

कर्जाच्या त्रासापासून सुटका होण्यासाठी मुग्यांना साखर आणि पीठ टाकल्याने कर्जाची लवकर परतफेड होते.

जुन्या संपत्तीशी संबधीत अडचण असल्यास अशा व्यक्तींनी रोज माशांना पीठाचे गोळे टाकल्यास अडचण दूर होण्यास मदत होते.

वरील पाच प्रकारच्या प्राण्यांना आणि पक्षांना धान्य टाकल्यास सर्व दु:ख दूर होऊन अक्षय पुण्याची प्राप्ति होते

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *