नमस्कार मित्रांनो.. Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्याच घरांमध्ये देवघर हे असते आणि आपण दररोज देवघर पूजत असतो. म्हणजे देवी देवतांची पूजा करीत असतो. या पूजेमध्ये आपण धूप, अगरबत्ती, दिवा यांचा वापर करतच असतो. मित्रांनो हिंदू धर्मांमध्ये देवांची पूजा करण्याची परंपराच आहे आणि देवपूजेचे आपणाला शुभ फळ देखील प्राप्त होत असते.

तर मित्रांनो आपल्या देवघरामध्ये वापरली जाणारी एक वस्तू म्हणजेच अगरबत्ती. मित्रांनो अगरबत्तीला शुभ आणि समृद्धीचे प्रतीक मानले गेलेले आहे. त्यामुळे मित्रांनो आपण सकाळ-संध्याकाळ आपल्या देवघरांमध्ये अगरबत्ती ही लावावी. यामुळे मग आपल्या घरामध्ये सकारात्मक विचार प्रभावित होतात. घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहते. परंतु मित्रांनो आपल्या वास्तुशास्त्रांमध्ये अगरबत्तीच्या संदर्भात अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत.

पंडित इंद्रमणी घनश्याल सांगतात की, विविध देवतांच्या पूजा-विधी वेळी अगरबत्ती वापरली जात असली तरी आठवड्यातील दोन दिवशी अगरबत्ती वापरण्यास मनाई आहे. असे केल्याने घरातील शांती-समृद्धीवर परिणाम होऊ शकतो. तर मित्रांनो कोणत्या दोन दिवशी आपल्याला अगरबत्ती आपल्या घरामध्ये लावायची नाही याविषयी आपण आता जाणून घेऊया.

मित्रांनो अगरबत्ती लावल्याने आपले घर हे खूपच शांततेचे राहते. प्रसन्नतेचे राहते आणि यामुळे देवताही आपल्यावर प्रसन्न होतात. तसेच त्यांच्या कृपेने सुख समृद्धी देखील आपणाला प्राप्त होते. मित्रांनो अगरबत्तीचा जो धूर असतो तो हवा शुद्ध करतो आणि त्यामुळे अनेक जिवाणू हानिकारकचे जिवाणू असतात ते नष्ट देखील होतात.

तसेच मित्रांनो अगरबत्ती शिवाय धूपबत्ती, कापूर लावून आपण देवांची पूजा करणे देखील शुभ मानले गेलेले आहे. तर मित्रांनो आठवड्यातील कोणत्या दोन दिवशी आपल्याला अगरबत्ती लावायची नाही हे जाणून घेऊया.

वास्तूनुसार, घरामध्ये बांबूच्या माध्यमातून सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो, त्यामुळे वातावरण प्रसन्न राहते. परंतु रविवारी आणि मंगळवारी बांबू जाळण्यास शास्त्रात निषिद्ध मानले जाते. त्यामुळे रविवारी आणि मंगळवारी अगरबत्ती लावू नये. असे केल्याने मानसिक आणि आर्थिक नुकसान होण्याचा धोका असतो. त्यामुळे घरात गरिबी येते आणि कुटुंबात तणाव राहतो असे मानले जाते.

तसेच पौराणिक शास्त्रानुसार मंगळवार आणि रविवारी बांबू जाळल्याने संततीची हानी होण्याचा धोका असतो. याशिवाय या दिवशी बांबू जाळल्याने पितृदोष निर्माण होतो.मग त्यामुळे कुटुंबात सुख-शांती राहत नाही. बांबू जाळल्याने दुर्दैव येते. परिवाराला आर्थिक संकटातून जावे लागेल. त्यामुळे मंगळवार आणि रविवारच्या दिवशी शास्त्रात अगरबत्ती जाळण्यास मनाई आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *