नमस्कार मित्रांनो.. Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! श्री स्वामी समर्थ, आपले स्वामी आपल्याला काही ना काही संकेत देत असतात. या संकेतावरून आपल्याला समजत असते की स्वामींचा आशिर्वाद आपल्यावर आहे की नाही. स्वामींच्या सेवेत आलेल्या प्रत्येक स्वामी भक्ताला स्वामींच्या सेवेचा अनुभव येत असतो. स्वामींवर श्रद्धा आणि विश्वास असेल तर तुम्हाला स्वामींच्या सेवेचा अनुभव नक्कीच येतो.

ज्यासाठी तुम्ही तयार आहात त्या गोष्टी स्वतः हून तुमच्या जवळ येतात. हा निसर्गाचा नियम आहे. म्हणून तुम्हाला जे हवे आहे त्याची तयारी करा. आणि स्वामींचे नामस्मरण करा. एकदा का तुम्ही तयार झालात की त्या गोष्टींना तुमच्या आयुष्यात यावेच लागते. स्वामींच्या सेवेत आलेल्या प्रत्येक सेवेकऱ्याला स्वामी कधी ना कधी दर्शन देतातच.

ते भक्तांच्या स्वामी कायम पाठीशी उभे राहतात. खूप मोठे साहस मिळते. तेव्हा या वाक्याची आठवण येते. “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” स्वामींच्या नामस्मरणाने कितीतरी गोष्टी लगेचच घडून येतात. कोण कोण सेवेकरी म्हणत असतात. आम्ही स्वामींची पूजा करतो आम्हाला स्वामी कधीच दिसत नाहीत.

स्वामी आम्हाला कधीच दर्शन देत नाहीत. आमची इच्छा अजून का पूर्ण होत नाही. कधी कधी चांगल घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावच लागते. तुम्हालाही स्वामींचे संकेत आले असतील. पण हे संकेत कसे ओळखावे? ते समजण्यासाठी आपल्याला स्वामींवर विश्वास असायला हवा.

ज्यांचा स्वामींवर अतूट विश्वास आहे त्यांना स्वामींच्या संकेतांचा अर्थ समजत असतो. स्वामींची नित्य सेवा करणाऱ्या भक्ताला स्वामी वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या प्रकारे स्वामी मदत करत असतात. परंतु हे सर्व संकेत प्रत्येकालाच ओळखता येत नाही. तर मित्रहो स्वामी महाराज आपल्या सेवेने खुश आहेत की नाही.

आपली सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे की नाही. हे कसे ओळखावे. आपला त्यांच्यावर आशिर्वाद आहे की नाही हे आपण कसे ओळखावे? अशा वेगवेगळ्या प्रश्नांमध्ये गुरफटून जाण्यापेक्षा आपण बघुया की स्वामींचा आपल्यावर आशिर्वाद आहे की नाही. ज्यावेळी आपण स्वामींची पूजा करत असतो.

स्वामींची पोथी वाचत असतो. जप करत असतो. तेव्हा आपण पूजेमध्ये मग्न असताना अचानक सुगंध दरवळू लागला तर नक्की समजावे. की स्वामींपर्यंत आपली पूजा नक्कीच पोहोचत आहे. आपल्यावर स्वामींचा आशिर्वाद आहे. स्वामी आपल्या अवती भोवती फिरत आहेत. मित्रहो दुसरा संकेत म्हणजे ज्यावेळी स्वामी समर्थ महाराज आपल्या स्वप्नात येतात.

स्वामी तुमच्या स्वप्नात आले तर समजून की तुमच्यावर खूप मोठा स्वामींचा आशिर्वाद आहे. स्वामींचे तुमच्या प्रत्येक हालचालीकडे बारीक लक्ष आहे. स्वामी तुमच्यावर कोणतेच संकट येऊ देणार नाहीत. तुम्ही खूप भाग्यवान आहात असे समजून जा. कारण स्वप्नात का होईना स्वामींनी तुम्हाला दर्शन दिले आहे.

हे खूप नशीबवान आणि पुण्यवान लोकांच्या वाट्याला येत असते. मित्रहो प्रत्येक वेळी तुम्हाला जर वाटत असेल की स्वामी आहेत पाठीशी होईल सगळे ठीक तेव्हा आपण जिद्दीने प्रत्येक गोष्टीला हसत खेळत सामोरे जातो तेव्हा ती शक्ती म्हणजेच स्वामींचा आशिर्वाद. तर मित्रहो हे काही संकेत जर तुम्हाला येत असतील तर तुमच्या सोबत स्वामी आहेत.

हे विचार मनात ठेवूनच तुम्ही तुमचे कार्य करावे. कोणतेही कार्य करत असताना घाबरून न जाता स्वामींवर दृढ विश्वास ठेवावा. आणि माझी सर्व कामे तुम्हीच मार्गी लावा. असे म्हणून त्यांना नमस्कार करावा. असे जे जे लोक करतात त्यांची सर्वच कामे निर्विघ्नपणे पूर्ण होतात. स्वामी ज्या लोकांच्या आयुष्यात संकेत देतात.

त्यांनी खूपच स्वतः ला नशीबवान समजावे. व स्वामी समर्थ महाराज आपल्या बरोबर असल्याचे समाधान देखील मानावे. हे सुख सगळ्यांच्याच वाट्याला येत नाही. असे नाही. जे लोक स्वामींची निस्वार्थ भावनेने सेवा करतात. त्यांच्या बाबतीत या सगळ्या गोष्टी नक्कीच घडतात. आपली सेवा कायम स्वामींच्या चरणी रुजू करा. सेवा करा आणि सेवेकरी व्हा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *