नमस्कार मित्रांनो.. Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! मित्रांनो आपण रोज करत असलेल्या देव पूजेमध्ये हळदीचा असा उपयोग करा आणि खूप उत्कृष्ट लाभ मिळावा. तुमच्या घरात सुखसमृद्धी समाधान ऐश्वर्य सर्वकाही येईल. मित्रांनो रोजच्या पूजेमध्ये एक चिमूटभर हळद ने करा हे एक काम त्यामुळे आपल्यावर धनाचा वर्षाव होईल. प्रत्येकाचा घरात किचनमध्ये असे काही मसाले किंवा पदार्थ असतात जे फक्त औषधीचे च काम नाही तर आपले भाग्य देखील चमकवण्याचे काम करत असतात आणि या चमत्कारी पदार्थामधील हा एक पदार्थ आहे तो म्हणजे हळद.

मित्रांनो हळद ही जितकी आपल्या आरोग्यासाठी व शरीरासाठी गुणकारी आहे तितकीच ती धार्मिक कामासाठी सुद्धा महत्वाची मानली जाते. आज मी तुम्हाला हळदीचे असेच चमत्कारिक उपाय सांगणार आहे. मित्रांनो हे उपाय जर तुम्ही केले तर तुमचे भाग्य बदलणार आहे व देवी लक्ष्मीचे तुमच्या घरामध्ये निरंतर वास्तव्य राहणार आहे. मित्रांनो हळदीमध्ये कितीतरी दिव्य औषधीचे गुण आहेत.
जर तुम्हाला तुमच्या आरोग्यविषयक काही समस्या असतील तर तुम्ही रोज पूजा करताना एक चिमूटभर हळद सोबत ठेवावी व पूजा झाल्यावर ती हळद गरजु व्यक्तीला दान करावी. हे अतिशय शुभ मानले जाते यामुळे आपल्या आरोग्याविषयी सर्व समस्या दूर होतात.

मित्रांनो, हळदीमुळे गुरुग्रह यातही वृद्धी होते व आपल्याला धन प्राप्त करण्यासाठी ही मदत होते आणि आपण देवघरात रोज देवासमोर दिवा लावतो पण हा दिवा जर तुपाचा असेल तर याचा आपल्याला कितीतरी पटीने जास्त फायदा मिळतो. पण आपण पूजा करताना आपल्या मनगटावर किंवा कपाळावर हळदीचा टिळा लावला तर आपला ग्रहस्पती ग्रह मजबूत होतो आणि आपल्या वाणीमध्ये ही मजबुतता येते आणि आपण बघतो की, लग्नाच्या आधी वधू आणि वर यांना हळद लावली जाते तर ते यासाठीच लावली जाते.

यासाठी कारण की त्यांना कोणतीही बाधा होऊ नये आणि त्यांचे संरक्षण व्हावे जेणेकरून त्यांना उत्तम स्वास्थ आणि उत्तम सुंदरता प्राप्त व्हावी आणि त्याचबरोबर मित्रांनो लग्नामध्ये काही अडचणी व बाधा निर्माण होत असतील तर काय करावे? जर विवाहामध्ये काही अडचणी किंवा बाधा निर्माण होत असतील तर शास्त्रामध्ये रोज पूजेच्या वेळी हळदीचा हा उपाय सांगितला आहे. हा उपाय खूप लाभदायक आहे आणि हा उपाय खूप साधा आहे तो म्हणजे आपली देवपूजा झाल्यावर कपाळावर हळदीचा टिळा लावायचा. यामुळे आपल्या विवाहात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात. व आपल्याला यश प्राप्त होते.

त्याशिवाय आपली देवपूजा झाल्यावर गणपती बाप्पा यांना एक चिमूटभर हळद मनोभावाने अर्पण केले असून आपल्या विवाहामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात. घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते व आपल्याला सुख समृद्धी समाधान आणि शांतता लाभते. आपल्याला जर घरामध्ये शांतता हवी असेल तर घरातील वातावरण सकारात्मक असणे खूप आवश्यक आहे आणि शास्त्रामध्ये असे सांगितले जाते की, आपल्या घराच्या बाहेरील भिंती वर हळदीच्या रेषा उमटवल्या तर त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही वाईट शक्ती आणि नकारात्मक विचार प्रवेश करत नाही व आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी, सुख सर्वकाही येत.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *