नमस्कार मित्रांनो.. Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!श्री स्वामी समर्थ, मित्रहो आज मी तुम्हाला स्वामींच्या आवडत्या अशा पाच गोष्टी सांगणार आहे. हया पाच गोष्टी जो भक्त पाळतो. त्याच्या लवकरच सर्व इच्छा पूर्ण होतात. त्याच्यावर स्वामींची कृपा ही नक्कीच होते. तर अशा कोणत्या पाच गोष्टी आहेत.

त्या स्वामींना मनापासून केल्या तर नक्कीच आवडतात. तर मित्रहो जो भक्त जो सेवेकरी या पाच गोष्टींचे पालन करतो. त्यांच्यावर स्वामींची कृपा ही नक्की बरसते. व स्वामी त्या भक्तावर त्याच्या कामावर प्रसन्न होतात आणि त्याला भरभरून यश देतात.

त्याच्या इच्छा पूर्ण करतात. म्हणून मित्रहो तुम्हीही स्वामींचे सेवेकरी आहात की नाही पण तुम्हाला विश्वास आहे स्वामी लिलेवर स्वामी शक्ति वर तर तुम्ही या पाच गोष्टी आपल्या आयुष्यात रोजच्या जीवनात नक्की करा. तर अशा पाच गोष्टी कोणत्या आहेत?

सगुण उपासना : आता सगुण उपासना म्हणजे काय? तर सगुण उपासना असते ती खऱ्या मनाने खऱ्या भक्ती भावाने उपासना. म्हणजे मनात कोणतीही लालच इच्छा नसते. फक्त उपासना करणे. फक्त स्वामींचा नाम जप करणे. तेही तुमच्याकडून स्वामी करून घेतात.

अन्नदान: शक्य तेवढे अन्नदान गरजू व्यक्तींना करणे किंवा कोणतीही मदत करणे स्वामींना अत्यंत आवडीची गोष्ट म्हणजे अन्नदान. अन्नदान जमत नसेल तर कोणत्याही गरजू व्यक्तीला कसलीही मदत करा. तुम्ही बघितला असेल आंधळ्या माणसाला रोड क्रॉस करायचा असतो त्याला मदत हवी असते. आपण बघतो पण आपण मदत करत नाही.

कारण आपण तेव्हा घाईत असतो कामात असतो. पण असं न करता आधी त्याला मदत करा किंवा जो व्यक्ती आपल्या घरी भिक्षा मागायला येतो. त्याला जेवण द्या त्याचं पोट भरा. कारण अन्नदानापेक्षा कोणताच मोठा उपाय नाही. अन्नदान हे सगळ्यात मोठा उपाय आणि तोडगा आहे. म्हणून अन्नदान हे स्वामींना खूप जास्त आवडते.

दत्त महाराजांचे नामस्मरण किंवा स्वामींचे नामस्मरण : दत्त महाराजांचे स्वरूप हे श्री स्वामी समर्थ आहेत. आपण दत्त महाराजांची माळ केली किंवा श्री स्वामी समर्थांचे माळ जप केला तर ते दोघांच्या फळ एकच आहे नाम स्वामींना अत्यंत प्रिय आहे. पण जेव्हा स्वामी हयात होते तेव्हा स्वामींचे अस्तित्व जगावर होते. तेव्हा ते स्वतःला स्वतः भक्तांना दर्शन द्यायचे.

तेव्हा ते फक्त एवढेच सांगायचे की, नामजप करा सगळं ठीक होईल. म्हणून नामजप करायला कधीही विसरायचं नाही. माळेने तुम्हाला जर नामजप करायचा नसेल किंवा देवासमोर बसून तुम्हाला नामजप करायला एवढा वेळ नसेल तर चालता बोलता काम करताना फिरता फिरता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं नामजप तुम्ही करू शकता.

माणूस जोडण्याची जनप्रियता : जो माणूस माणसे जोडत असतो. म्हणजे ज्या माणसाला माणसे जोडण्याची आवड आहे. त्यांना प्रियता आहे. तो माणूस स्वामींना खूप आवडतो. स्वामींच्या केंद्रात किंवा स्वामींच्या मठात जाणाऱ्या प्रत्येक माणसाला माहिती असतं.

की स्वामींची सेवा करताना माणसे कसे जोडायचे. माणसांना स्वामी सेवेबद्दल कशी माहिती द्यायची. कसे चांगले अनुभव सांगायचे. हे त्यांना नक्की माहित असतं. म्हणून माणसे जोडणारी लोक स्वामींना अत्यंत प्रिय असतात आणि माणसे तोडणारी लोकं स्वामींना कधीच आवडत नाहीत. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा की माणसे जोडा चांगले बोला.

चांगले अनुभव स्वामींचे सांगा. काही समस्या असतील काही दुःख असतील तर तुम्ही चिंता करू नका. विश्वास ठेवा स्वामींवर कारण स्वामींच्या सेवेत आलेल्या प्रत्येक सेवेकरीला स्वामी भरभरून देतातच. त्यामुळे कोणताही सेवेकरी असेल संकटात असेल तर त्याला स्वामी भक्तीत आणणे. हे सुद्धा खूप मोठे पुण्याचे काम आहे.

जे आहे त्यात समाधान मानने : स्वामींना अत्यंत प्रिय आहे ते म्हणजे प्राप्त भक्तांची जी परिस्थिती असते त्यातच समाधान मानायचं. आनंदित राहायचं म्हणजे आता जे पण तुमच्याकडे आहे. जे देवाने आपल्याला दिलेल आहे. तुम्ही कमावलेलं आहे. त्यात खुश रहा. आनंदीत रहा. समाधानी रहा.

कारण आपण बऱ्याच लोकांना बघतो की, माझ्याकडे हे नाही मला देवाने असं दिलं नाही पण स्वामींना ही गोष्ट कधीच आवडत नाही. स्वामींना हेच आवडतं की तुम्हाला जे दिले ते तुम्ही समाधान राहा. कारण जी परिस्थिती असते. ते कायम नसते ती कधी ना कधी पालटते. म्हणून कोणतीही परिस्थिती असो त्यामध्ये आनंदीत रहा.

स्वामी तुमचे चांगलेच करणार. तर बघा मित्रहो, या पाच गोष्टी जर आपण नित्यनेमाने पाळल्या तर आपल्याला खरंच स्वामींची कृपा होईल तर या पाच गोष्टी कोणत्या कोणत्या तर उपासना, सगुण उपासना, गरजूंना मदत, अन्नदान, दत्त महाराजांचे श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण, माणूस जोडण्याची जनप्रियता आणि जी परिस्थिती आहे.

त्या समाधान मानायचं या पाच गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि आचरणात आणायच्या. बघा तुमच्यावर स्वामींची नक्कीच कृपा होईल. म्हणून मित्रहो आपण सेवा करताना आपल्याबरोबर अनेक असे सेवेकरी आहेत. की ज्यांना स्वामींचे सेवेत आणण्याचे खूप गरज आहे. कारण आपल्याला काही करायचं नाही.

फक्त स्वामींचे नामस्मरण करायला सांगायचं आहे. की त्यातून त्यांच्या टेन्शन दूर होईल. ते सुद्धा स्वामींच्या सेवेत येतील. आणि ते सुद्धा आनंदित राहतील. स्वामींनी जसा आपल्याला भरभरून दिल आहे. तसेच स्वामी त्यांनाही देतील. म्हणून आपली कायम सेवा स्वामींच्या चरणी रुजू करा. सेवा करा आणि सेवेकरी व्हा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *