स्कार मित्रांनो.. Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्याच घरी देवघर असते. आपण देवघरांमध्ये दररोज देवांची पूजा करतो. आरती करतो तसेच नैवेद्य हे दाखवतो. आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये तसेच कोणत्याही संकटे तसेच घरामध्ये शांततेचे वातावरण रहावे यासाठी आपण मनोमन प्रार्थना करीत असतो.

तर मित्रांनो अशी ही देवपूजा करीत असताना अशा काही वस्तू आहेत या वस्तू तुम्ही जमिनीवर अजिबात ठेवायच्या नाहीत. कारण यामुळे मग वास्तुदोष निर्माण होतो. तसेच मित्रांनो आपल्याला आर्थिक नुकसान होते. घरामध्ये चिडचिड राहते आणि आपल्याला पूजेचे शुभ फल प्राप्त होत नाही.

तर मित्रांनो वास्तुशास्त्रामध्ये आपणाला अशा काही वस्तू सांगितलेल्या आहेत या वस्तू आपण पूजा करताना अजिबात जमिनीवर ठेवायच्या नाहीत. चला तर मग जाणून घेऊया त्या नेमक्या कोणत्या वस्तू आहेत ते. तर मित्रांनो कधीही तुम्ही पूजा करताना देवाची मूर्ती किंवा फोटो असेल तर तो अजिबात जमिनीवर ठेवायचा नाही. बरेच जण हे पूजा करताना देवाची मूर्ती किंवा फोटो हे जमिनीवर ठेवतात.

परंतु मित्रांनो यामुळे मग आपल्याला आर्थिक नुकसान होऊ शकते. तसेच आपल्या घरामध्ये वास्तुदोष देखील निर्माण होऊ शकतो आणि आपल्या घरामध्ये वाद-विवाद निर्माण होतात. त्यामुळे मित्रांनो तुम्ही कधीही देवाची मूर्ती किंवा फोटो हे स्वच्छ कपड्यावर किंवा उंच ठिकाणी ठेवावे. तसेच मित्रांनो बरेच जण हे पूजा करताना शिवलिंग जमिनीवर ठेवतात.

परंतु ही चूक मित्रांनो अजिबात करायची नाही. तर मित्रांनो तुम्ही एखादे स्वच्छ कापड अंथरून त्यावरती शिवलिंग ठेवू शकता. तसेच मित्रांनो आपल्या देवघरांमध्ये जर शंख असेल तर हा शंख देखील तुम्ही जमिनीवर ठेवायचा नाही. शंख हा देवी लक्ष्मीचा भाऊ मानला जातो. शंख वाजवल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते. त्यामुळे मित्रांनो तुम्ही पूजा करताना कधीही शंख जमिनीवर ठेवायचा नाही.

फुल, तुळस, धूप, दीप, कापूर, चंदन, जपमाळ हे साहित्य देखील आपण पूजेमध्ये वापरतो आणि या वस्तूंना देखील विशेष असे महत्त्व आहे. त्यामुळे मित्रांनो या देखील वस्तू आपण अजिबात जमिनीवर ठेवायच्या नाहीत. वस्तू जमिनीवर ठेवणे अशुभ मानले गेलेले आहे.

तसेच मित्रांनो पूजा सामग्री मध्ये जे काही साहित्य आपण वापरतो म्हणजेच कलश, पाणी, दिवा, अगरबत्ती या वस्तू देखील आपण जमिनीवर ठेवायच्या नाहीत. यामुळे आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊ शकतो.

आपण जेव्हा पूजा करीत असतो त्यावेळेस आपण आसन घेऊनच पूजा करायचे आहे. बरेच जण हे पूजा करताना आसन वापरत नाही. परंतु मित्रांनो जर तुम्ही आसन वापरले नाही तर तुमची पूजा ही सफल मानली जात नाही. त्यामुळे कधीही तुम्ही पूजा करीत असताना आसन घ्यायचे आहे. तसेच मित्रांनो आपल्या देवघरामध्ये सकाळ-संध्याकाळ दिवा प्रज्वलित असावा. यामुळे आपले घर हे प्रसन्नतेचे राहते.

तर मित्रांनो अशा प्रकारे वरील सांगितल्याप्रमाणे तुम्ही पूजा करीत असताना या पवित्र वस्तू अजिबात जमिनीवर ठेवायच्या नाहीत. ज्यामुळे आपणाला अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *