नमस्कार मित्रांनो.. “Marathi Duniya” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! मित्रांनो, आजच्या या लेखामध्ये आपण स्वामींचे नित्यसेवा मध्ये या तीन गोष्टी चुकूनही विसरायच्या नाही आहेत अशा गोष्टींची माहिती करून घेणार आहोत. कारण स्वामी सेवेतील या तीन गोष्टी जर विसरला तर स्वामींचा आशीर्वाद आपल्याला मिळणार नाही. स्वामीं भक्ताच्या पाठीमागे उभे राहत असतात. त्यांची श्रद्धेने मनोभावाने भक्ती व नित्यसेवा करत असतात. म्हणूनच याची माहिती आज आपण करून घेणार आहोत.

त्यातीलच पहिली गोष्ट म्हणजे स्वामी नामाचा जप. “श्री स्वामी समर्थ” नामाचा जप आपल्याला दररोज न चुकता करायचा आहे. फक्त त्यामध्ये श्रद्धा भाव असणे गरजेचे आहे. तुम्ही हा जप कुठेही, कधीही, केव्हाही करू शकता. फक्त तो आपण किती श्रद्धेने करतो याला जास्त महत्त्व आहे. तुम्ही कुठे बोलता किंवा कसे बोलतात किंवा कधी बोलता, कोणत्या वेळेस बोलता त्याला काहीही महत्त्व नाही.
फक्त श्रद्धा असणे गरजेचे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे श्री स्वामी समर्थ सारामृताचे दररोज नित्य नियमाने तीन अध्याय वाचणे आवश्यक आहे. जे स्वामीचे नित्यसेवा करत असतात त्या व्यक्तीने या सार अमृताचे दररोज तीन अध्याय वाचन हे खूप गरजेचे आहे. कारण या ग्रंथाचे वाचन केल्यामुळे त्यांचे अनेक प्रश्न सुटतात. त्याचे प्रचिती अनेक जणांना आलेली आहे.

म्हणून स्वामींच्या नित्यसेवा मध्ये सारामृत-अध्याय क्रमशा वाचणे खूपच गरजेचे आहे. या ग्रंथामध्ये स्वामींच्या अनेक लीलांचे वर्णन केले आहे. त्याचबरोबर मानवी स्वभावांचे ही वर्णन केले आहे. त्यातून आपल्याला काही गुण घेता येतील. याचाही विचार केला पाहिजे.

तिसरी गोष्ट म्हणजे सतत आपण कोणत्या ना कोणत्या गोष्टींमध्ये व्यस्त राहिले पाहिजे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, सतत कामांमध्ये राहणे आणि स्वामींचे नित्य सेवा करणे यामध्ये काय संबंध आहे?. तरी यामध्ये संबंध आहे. कारण स्वामी समर्थ म्हणत असतात की, आळशी व्यक्तींचे कधीही तोंड बघू नका. म्हणून आपल्याला सतत काहीतरी कामांमध्ये राहीले पाहिजे.

तरी चालेल पण सतत काही ना काही काम केलेच पाहिजे विनाकारण वेळ घालवणे किंवा आळशी वृत्ती ठेवणे हे स्वामींना कधीही आवडत नाही म्हणून कधीही आयुष्य वृत्ती ठेवू नये सतत आपल्याला कामांमध्ये व्यस्त ठेवावे व नवीन गोष्टींचा शोध घेण्यास उत्सुक रहावे

अशा प्रकारे स्वामींच्या सेवेमध्ये या तीन गोष्टी करणे खूप गरजेचे आहे. जर या तीन गोष्टी आपण नियमितपणे केला तर स्वामी आपल्याला नक्कीच आशीर्वाद देतील. ते आपल्या सदैव पाठीशी उभे राहतील. त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल आणि ते कोणत्याही संकटांमध्ये आपल्याला एकटे सोडणार नाहीत आणि आपल्यावर कोणतेही संकट येऊ देणार नाही.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *