नमस्कार मित्रांनो.. “Marathi Duniya” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! या व्यवहारी जीवनात जगत असताना काही गोष्टी ज्या आपण दुर्लक्षित करतो त्या काही वेळेस आपल्या आयुष्यावर परिणाम करतात. काही गोष्टी आपण अजाणतेपणी करतो तर काही गोष्टी कितीही मनाई असली तर मुद्दाम करतो. परंतु परिणाम कसेही असोत आपल्याला भोगावे लागतात. त्यामुळे काही गोष्टींची काळजी ही आधीच घेतली पाहिजे.

पती पत्नी मधील नाते सं बं ध कसे असतात त्यावरती त्यांचा संसार असतो. तसेच त्यामुळे जीवनात काही गोष्टी आपण लक्ष देऊन केल्या पाहिजेत. आपणा सर्वांना दानवांचे गुरू शुक्राचार्य ठाऊक आहेतच, त्यांचा आशीर्वाद दानवांचे विजयाचे कारण होता. पतीच्या यशाचे कारण जसे पत्नी असते तसेच त्याच्या अपयशाचेही कारण ती बनू शकते तेही काही छोट्या गोष्टींमुळे.

शुक्र नीती म्हणजे विजय प्राप्तीसाठी वापरल्या जाणाऱ्या कुटनीती म्हणून ओळखल्या जातात. त्या आपण यश, अपयशी होण्यासाठी कारणीभूत ठरतात. जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी शुक्र नितीचा नक्की वापर करा. महिलांविषयी खूपच सत्य व रोचक माहिती शुक्राचार्य यांनी दिली आहे. जीवनात जर फसगत होऊ नये असे वाटत असेल तर एकवेळ शुक्र नीतीचा अभ्यास जरूर करा.

स्त्रीचा स्वभाव, तिची दृष्टी, तीचे वर्तन याचा परिणाम त्या स्त्रीच्या पतीच्या आयुष्यावर होत असतो. त्यामुळे या अशा काही गोष्टी आहेत ज्या पुरुषांना माहीत असणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही स्त्रीच्या मोहाला बळी पडणार नाही. तुमची बरबादी होणार नाही.

दुष्ट स्त्रिया या आयुष्यभर खोटं बोलतात, त्या खोटं बोलण्यात कोणत्याही थराला जाऊ शकतात, म्हणून कोणत्याही पुरुषाने कधीही स्त्रीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नये. शहानिशा केल्याशिवाय डोळे झाकून विश्वास ठेवू नये. आईला बायकोचं ऐकून तर बायकोला आईच ऐकून थेट बोलू नये.

काही दुष्ट स्त्रिया या खूप ढोंगी असतात. नाटकी करत जगतात, त्यामुळे पुरुषांनी अशा स्त्रियांपासून दूर रहावे. स्त्रिया नाटक करून सारं काम आपल्या पतीकडून करवून घेतात. त्यामुळे त्यांचे रंग वेळीच ओळखून त्यांच्यापासून सावध रहावे.

तिसऱ्या प्रकारच्या दुष्ट स्त्रिया या विचार न करता कोणतीही गोष्ट करत असतात त्यामुळे त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतात. अविचारिपणे केलेली गोष्ट ही नुकसान पोचवते त्यामुळे तुम्ही अशा स्त्रियांपासून दूर रहा. काही स्त्रिया या कपट कारस्थान करण्यात माहीर असतात.

त्यांचे कर्म वेळीच पारखून अशा गोष्टी करण्यापासून त्यांना परावृत्त करा. अशा वेळी तुम्ही जास्त सावध, विचार करून वागले पाहिजे. शुक्र नितीनुसार काही स्त्रिया या कमालीच्या स्वार्थी असतात, त्या स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. एखाद्याचा जीव जरी गेला तरी अशा स्त्रियांना काहीच वाटत नाही.

काही स्त्रिया या खूपच लालची असतात. त्या इतक्या लालची असतात त्या त्यांच्या मागण्या संपतच नाहीत त्यामुळे त्यांच्या मागण्या पूर्ण करताना त्यांचे पती सर्व संपत्ती गमावून बसतात. अशा लालची महिला आपल्या पतीच्या नजरेआड काहीही करण्यास मागे पुढे पाहत नाहीत.

काही स्त्रियांना खूप भयंकर अहंकार असतो, त्यांच्या रूपावर, सौंदर्यावर खूप माज असतो त्यामुळे त्या स्वतःच्या जगात जगत असतात व बाकी लोकांना कंगाल करतात. अशा स्त्रियांपासून पुरुषांनी नेहमीच सावध राहणे गरजेचे आहे. नाहीतर तुम्ही पूर्णपणे कंगाल, बरबाद होऊ शकता

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *