श्री स्वामी समर्थ एका शहरात एक श्रीमंत माणूस राहत होता. त्याचे अनेक कारखाने होते. तसा वृत्ती नाही तो खूप दानशूर होता. पण एक नंबर चा नास्तिक होता. कुणी त्याच्याकडे मदत मागण्या साठी आले तर त्याला तो कधीच रिकाम्या हाताने परत जाऊ देत नसाय चा.एका रात्री आपले जेवण आटपून तो आपल्या घराबाहेर फिरत होता. अचानक त्याला खूप अस्वस्थ वाटू लागले आणि लगेच डॉक्टर ना बोलावले. सर्व काही तपासले पण निष्पन्न काहीच झाले नाही. डॉक्टर नी त्याला झोपे साठी गोळी दिली आणि निघून गेले. रात्री चे साडेतीन वाजले गोळी घेऊन ही त्याला झोप मात्र आली नाही. त्या ची अस्वस्थता तशीच होती. झोप येत नाही म्हणून तो आपल्या अंगणात फिरू लागला. अंगणात फिरताना त्याने बाहेर पाहिले तर त्याला आश्चर्य वाटले. कारण इतके निर्मनुष्य रस्ते त्याने कधीच पाहिले नव्हते. त्याला थोडे बरे वाटाय ला सुरू झाले होते मग तो घराबाहेर पडला आणि थोडा दूर चालत गेला.

घराजवळच एक बगीचा ही होता. तोही त्या वेळी पूर्णपणे रिकामा होता. आपल्या पाया तील चप्पल काढून तिथल्या हिरवळी वरती पाय पसरून बसला. त्याला आणखीन शांत वाटू लागले. थोडा वेळ गेला आणि त्याला त्याच्या बाजूला काहीतरी हालचाल जाणवली. पाहिले तर काय? एक कुत्रा त्या ची एक चप्पल तोंडातघेऊन तिथून जात होता. ते पाहून तो ओरडला आणि त्याला बघून कुत्रा पडू लागला. दुसरी चप्पल हातात घेऊन तो देखील त्या कुत्र्या च्या मागे पडू लागला.

थोडे अंतर गेले आणि तो कुत्रा एका वस्तीजवळ आला आणि घाबरून तोंडा ची चप्पल खाली टाकून पळून गेला. आह आपली चप्पल मिळाली म्हणून त्या माणसा ने सुटके चा श्वास सोड ला. पण चप्पल घालत असताना त्याला कुणा चे तरी रडणे काना वरती पडले. करण्याच्या दिशेने गेला तर त्याला समजले की तो आवाज एका झोपडी तून येत होता. झोपडी चे दार उघडेच होते. त्याने आठ डोकावून पाहिले तर त्याला समजले की आत एक लहान मुलगी अंथरूणावर ती झोपून आहे. आणि त्या मुली ची आई जोर जोरात देवाचे नाव घेऊन टाहो फोडत आहे. दुसऱ्या ला मदत करण्याची त्या ची सवय होती म्हणून तो त्या झोपडीत गेला आणि त्या बाईला हात जोडून विचारले, बाय. काय झाले? इतक्या रात्री इतके जोरात का रडत आहात?

मुली ला काही झाले तर नाही ना? त्याला बघून ती बाई दचक ली. पण त्याचे बोलणे ऐकून तिला आपली रडणे अनावर झाले आणि ती म्हणाली. काय सांगू साहेब पोरगी खूप आजारी आहे. हिच्या इलाजा साठी खूप पैसा लागणार आहे. डॉक्टर म्हणतात ऑपरेशन नाही केले तर पोरगी जास्त जगणार नाही. इतक्या घर ची धुणी भांडी केली पण काही उपयोग नाही.या जन्मा तर इतका पैसा जमा होईल असे काही वाटत नाही. तो माणूस म्हणाला.आह ते सगळं मान्य आहे. पण इतक्या रात्री इतके जोरात रडून तरी काय फायदा आहे?
तुम्ही स्वतः ला त्रास करून घेत आहात. त्या पेक्षा कुणाला तरी मदत पाहून पाहिलीत का? बाई म्हणाली, सगळं करून पाहिल्यास आहे. कुडी इतक्या मोठ्या रकमे ची मदत करू शकत नाही. मग शेवटी काल एक साधू आला होता. त्याला कसं काय माहिती की मी दत्तगुरू ची भक्त आहे काय? माहिती पोरी ची अवस्था बघून ते म्हणाले की तुझी अडचण दत्तगुरु सोडती.

तू फक्त पहाटे 4:00 वाजता उठून देवाला जोर जोरात गार् हाणे घाल. तुझी समस्या सुटेल. म्हणून मी त्या रात्री देवाकडे असे गार् हाणे घालत आहे. तो माणूस भले ही नास्तिक होता पण दत्तगुरूंचा फोटो त्याने अनेक वेळा पाहिला होता. त्याच्या इथे पर्यंत पोहचण्या चे कारण तो कुत्रा होता हे आठवून त्याच्या अंगावर ती सर्रकन काटा आला. एका क्षणात तो नास्तिक चा अस्त झाला इतकेच नाही, पण त्याचा अस्वस्थपणा ही आता पूर्णपणे नाही सा झाला होता. त्याने लगेच एक ॲम्ब्युलन्स बोलाव ली आणि त्या मुली चा दुसरा दवाखान्या चा नाही. पण तिच्या पुढच्या शिक्षणा चाही खर्च त्याने उचलाय चे ठरवले. त्या बाई लाही त्याने आपल्या फॅक्टरी मध्ये नोकरी दिली आणि राहाय ला फॅक्टरी चे क्वार्टर दिली.

गोष्टी चे तात्पर्य हेच आहे की जर आपण ही आयुष्यात खचून गेला आहात तुम्हाला ही वाटत असेल की तुमच्या समस्यां वरती काही समाधान नाही तर असे खचून जाऊ नका.
पूर्ण भक्ति नें सेवा करत रहा.

देवा वर विश्वास ठेवा.

तो कधी कुठल्या रूपाने तुमच्या साठी कसा उभा राहणार आहे हे तुम्ही विचार ही करू शकत नाही.

श्री स्वामी समर्थ…….

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *