नमस्कार मित्रांनो.. Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!हिंदू धर्मातील विवाहित महिलांसाठी मंगळसूत्र हा सर्वात महत्त्वाचा अलंकार मानला जातो. मंगळसूत्र हे लग्नाचं आणि सौभाग्यचं प्रतिक म्हणून परिधान केलं जातं. मंगळसूत्राचा महिमा प्राचीन काळापासून सांगितला जातो. हिंदू सनातन धर्माची परंपरा आज ही पाळली जाते कारण प्रत्येक विवाहित स्त्रीसाठी मंगळसूत्र मांगल्याचा धागा खूप महत्त्वाचा मानला जातो.

पण तुम्हाला माहिती आहे का? मंगळसूत्रामधील काळे मणी आणि वाट्यांचा आध्यात्मिक अर्थ नेमका काय आहे ते ज्योतिष शास्त्रानुसार मंगळसूत्राचं काय महत्व आहे? आणि मंगळसूत्र कसं बनवायचं?

ज्योतिष शास्त्रानुसार सोन्याला बृहस्पतीचा कारक मानला जातो. ब्रम्ह ग्रह वैवाहिक जीवनात सुखांचा कारक मानला जातो. शनीला काळे मोती मानले जाते. शनीला स्थिरतेचं प्रतीक मानलं जातं.

अशा प्रकारे मंगळसूत्रामुळे शनी ग्रहाच्या प्रभावा मुळे वैवाहिक जीवनात स्थिरताण्याची शक्ती येत असते असं सांगितलं जातं. मंगळसूत्र हिंदू विवाह विधीचा प्रमुख भाग मानला जातो. लग्नाच्या वेळी वधूच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं जातं.

या विधी शिवाय विवाह अपूर्ण राहतो तर दक्षिण भारतातील काही राज्यां मध्ये मंगळसूत्राचं महत्व सप्तपदी पेक्षाही जास्त म्हटलं जातं आणि या परंपरा किंवा विधी शिवाय लग्न पूर्ण होणे शक्य नसतं.

मंगळसूत्रामधील काळे मणी आणि वाट्यांचा आध्यात्मिक अर्थ आधी जाणून घेऊ या. मंगळसूत्राच्या दोन वाट्यामध्ये एक वाटी शिवाची तर दुसरी वाटी शक्तीचं प्रतिक मानलं जातं. शिवशक्तीच्या बळावरच सासरच्या मंडळींचा रक्षण आणि सांभाळ करावा असा असतो अशी त्यांची धारणा असते.

दोन वाट्यांना गुंफणारी तार ही माहेरच्या कुल देवीची उपासना सोडून आता सासरच्या कुल देवीची उपासना करण्या संबंधी हिंदू धर्माने दिलेला परवानगीतील आदान प्रदानाचा स्रोत मानलं जातं.

तर याव्यतिरिक्त मंगळसूत्रातील या दोन्ही वाट्या प्रतीकात्मक असतात. एक वाटी हळदीची आणि दुसरी पार्टी कुंकवाची असते असंही म्हटलं जातं. याचे दोन अर्थ सांगितले जातात. असं म्हणतात की माहेरच्या वाटे हळद तर सासरच्या वाटीत कुंकू भरून कुल देवीला स्मरून मंगळसूत्राची पूजा करून मग ते मुलीच्या गळ्यात घातलं जातं.

मंगळसूत्र हे सौभाग्याचे आले नसल्याना वैवाहिक स्त्रिया धारण करतात. आणि त्या मध्ये दुसरे कारण म्हणजे पत्नीला काही इजा झाली किंवा तिच्या वर काही दु, ख कोसळ तर पती तिचं दुःख दूर करतो.

जशी हळद एखाद्या जखमेवर लावतात आणि ती जखम बरी होत असते. अगदी त्याचप्रमाणे पती हा पत्नीसाठी हा निधीचे कार्य करतो. म्हणजे ती जी काळजी घेऊन दुःख दूर करतो आणि दुसरी पार्टी कुंकवा ची म्हणजे ते प्रेमा चं प्रतीक असतं आणि तरच संसार सुखाचा होतो.

मंगळसूत्रा दोन पदरी दोर् यात काळे मणी गुंफलेले असतात. मध्यभागी चार छोटे मणी आणि दोन लहान वाट्या असतात. दोन दोरे म्हणजे पती पत्नी चे बंधन दोन वाट्या म्हणजे पती, पत्नी तसेच चार काळे मणी म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ मानले जातात तर बाकी काळ्या रंगा ची मोठी वाईट नजरे पासून संरक्षण करतात.

असाहाय्य संपूर्ण मंगळसूत्रा चा अर्थ आहे तर आता हे मंगळसूत्र कसं बनवायचं? मंगळसूत्राची लांबी पोटा पर्यंत असावी. कारण येथे अनाहत चक्राचं स्थान असतं. मंगळसूत्राच्या वाट्या त्या अनाहत चक्रा ला स्पर्श झाल्या पाहिजेत.

एवढी लांबी नक्कीच असली पाहिजे. त्यामुळे स्त्रीयांच, मन आणि चित्त शांत राहतं असं म्हणतात. कारण त्यांना सर्वच जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. त्या चक्रा मधून स्त्रीला आत्मिक शक्ती मिळत असते आणि त्याचा प्रभाव संपूर्ण घरावर पडत असतो.

आता हे आत्मिक शक्ती चंबळ स्त्रीला मिळावं म्हणून आपल्या पूर्वजांनी मंगळसूत्रात वाटीची प्रथा निर्माण केली. असं म्हणतात. मात्र हे मर्म न समजल्या मुळे हल्ली स्त्रिया मंगळसूत्रा वापरत नाही आणि म्हणून समाजात संसारात कलह वाढतात असं मानलं जाऊ लागलं आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *