कलयुगामध्ये ईश्वरा पर्यंत पोहोचण्याचा एक साधा सोपा सरळ मार्ग आपल्याला संतांनी सांगितलेला आहे आणि तो म्हणजे नामस्मरण. हरी मुखे म्हणा हरि मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी? त्या प्रकारे नामस्मरण करत करत आपण ईश्वरापर्यंत पोहोचतो.

ईश्वर आपल्या पर्यंत पोहोचतो आपल्या मधलं आणि ईश्वरा मधलं अंतर निघून जातात. पण हेच नामस्मरण करताना ते वेगवेगळ्या प्रकारचं आहे, बराचसा गोंधळ असतो की कोणत्या प्रकारची माळ वापरावी. चला तर मग जाणून घेऊ या की कोणत्या प्रकारच्या माळेचा वापर केला असता, कशा प्रकारचा लाभ होतो आणि त्याचबरोबर आपल्या इष्ट देवते प्रमाणे कोणत्या जपमाळ ची निवड करायला हवी.

मित्रांनो सुरुवात करूया रुद्राक्षाच्या माळेपासून ही सगळे जण सर्रास पणे वापरतात. नामस्मरण करताना ज्या विविध प्रकारच्या माळा वापरल्या जातात यामध्ये रुद्राक्षाच्या माळेचा वापर अधिक दिसून येतो. रुद्राक्षाचे अनेक प्रकार असतात. एक मुखी पंचमुखी बरेच मात्र नामस्मरण करताना साध्या रुद्राक्षाची माळ वापरली तरी चालते. गणपती, गायत्री देवी, दुर्गा देवी, महादेव, शिवशंकर कुमार, कार्तिकेय आणि पार्वती माता यांच्या नामस्मरण करताना रुद्राक्षाची माळ वापरणं लाभदायक ठरतं.

याशिवाय रुद्राक्षाची माळ गळ्यात घातल्याने सुद्धा ह्रदयरोग, रक्तदाब नियंत्रणा मध्ये राहतो. तसंच रुद्राक्षाच्या माळेत अकस्मात मृत्यू टाळण्याची एक मोठी ताकद सुद्धा असते. आणि म्हणूनच तुम्हाला एक अनामिक भीती वाटत असेल किंवा तुमचं मन बेचैन राहत असेल तर तुम्ही नामस्मरण करताना रुद्राक्षाची माळ वापरू शकता.

आता दुसरी एक माळ असते. तुळशीची माळ नामस्मरण जेवढे जास्त करता येईल तेवढं चांगलं ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, आंधळ्याने पाणी भरावं तसं नामस्मरण करावे, भांडा भरला किती आणि रिकामा किती हे त्याला समजत नाही तो घरातच राहतो तसंच सतत नाम घेत आहोत श्री हरि विष्णू, श्रीराम, श्रीकृष्ण श्री सूर्य नारायण यांच्या नामस्मरण करण्यासाठी तुळशीची जपमाळ वापरावी.

वारकरी संप्रदायात तुळशीच्या माळेला अनन्यसाधारण महत्व आहे. वारकर्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असते. तुळशीची माळ घातल्याने शरीर आणि मन शुद्ध होतं. त्यानंतर माळेचा एक प्रकार आहे. स्फटिकाची नामस्मरण करताना उच्चारापेक्षा नामाला अधिक महत्व असतं. दुर्गादेवीच्या सर्व रूपांचा नामस्मरण करण्यासाठी स्फटिकांची जप माळ वापरावी.

याशिवाय लक्ष्मीदेवी माता सरस्वती यांच्या नामस्मरण करण्यासाठी सुद्धा स्फटिकांच्या माळाचा वापर केला जातो. स्फटिकाची माळ घातल्याने आर्थिक परिस्थिती सुधारते तुम्हाला आर्थिक अडचणी असतील तर तुम्ही स्फटिकाच्या माळे वर माता लक्ष्मीचा नामस्मरण करू शकता. त्याचबरोबर रक्त संबंधीचे आजार आणि रागावर नियंत्रण मिळवण्या साठी सुद्धा स्फटिकांची माळ गळ्यात घालण्याचा सल्ला दिला जातो. त्यानंतर शुभ्र चंदनाची जपमाळ नामस्मरण कुठेही करता येतात. स्थळकाळाच्या त्याला बंधन नाही.

नामस्मरण करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे नामस्मरण करताना आपलं मन पवित्र व मन प्रसन्न व नामस्मरणाला किंवा नामजपाला मर्यादा नाहीत. कोणत्याही देवतेच्या नामस्मरणासाठी तुम्ही शुभ्र चंदनाची माळ वापरू शकता. देवतांच्या पूजनाच्यावेळी चन्दन वापरतोच की वैज्ञानिक दृष्ट्या विचार केल्यास शुभ्र चंदनाची माळ गळ्यात धारण केल्याने शरीर शुद्ध होतो.

ताजंतवानं होतं. मनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. त्यानंतर रक्तचंदनाची बात दुर्गा देवीचा नामजप करण्यासाठी सुद्धा रक्त चंदनाच्या माळेचा वापर होतो आणि ती लाभदायक सुद्धा ठरते. त्याचबरोबर रक्त चंदनाची माळ धारण केल्यास त्याचा उपयोग मधुमेह असणार्या व्यक्तींनाही होतो तर मंडळी थोडक्यात काय? कुठल्याही माळेने करा पण नामस्मरण नक्की करा. नामस्मरण केल्याने आपल्या मधील आणि ईश्वरा मधील अंतर कमी होतं. पण हे नुसता ऐकून उपयोग नाही तर त्याचा अनुभव घेऊन पाहायला हवा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *