शेगावचे श्री गजानन महाराज साक्षात अनंत कोटी ब्रह्माण्ड नायक : गण गण गणात बोते
नमस्कार मित्रांनो आणि भगिनीनो आज आपण पाहणार आहोत की अनंत कोटी ब्रह्माण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्मह सच्चिदानंद भक्तप्रतिपालक शेगावनिवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज यांच्या जीवन चरित्राचा कालखंड ३२ वर्षाचा आहे. याकाळामध्ये महाराजांनी खूप चमत्कार केले. २३ फेब्रुवारी १८७८ रोजी ते प्रथमच ऐन तारुण्यात ते शेगावी दिसले. शेगावमधील ती भर उन्हाळ्यातील दुपार होती. तेव्हड्यात एका वाडाच्या झाडाखाली एक विचित्रस वाटणारा पण तेजपुंज तरुण फेकून दिलेल्या पत्रावळीवरील अन्नाची शीत वेचून खात होता. त्यांच्या तोंडातून गण गण गणात बोते असा नामघोष चालला होता.

त्या नामघोषात त्या तरुणाला रणरणत्या उन्हाचही काही वाटत नव्हतं. गजानन महाराजांचं पहिलं दर्शन असा झालं. बंकटलाल आणि दामोदर या दोघा तरुणांनी प्रथम पाहिलं. आणि त्यांच्या त्या विचित्र वागण्यापेक्षाही त्याच्या चेहऱ्यावरच्या तेजस्वी भावानेच हे त्यांच्याकडे आकर्षित झाले.हे कोण दिव्या पुरुष आहेत. याची त्यांना खात्री पाटली. म्हणून ते त्यांना गावात घेऊन आले. लोकही त्यांना पाहायला गर्दी करू लागले. त्यांना पंचपक्वान्न, कपडे, दागिने, असे काही वाहायला लागले.

महाराज निरिच्छपणे ते सर्व फेकून देत असत. त्यांच्या वागण्याचा आद्मास कोणालाही येत नसे. ते कोठेही झोपत. काहीही खात. आणि कपडे घातले तर घातले नाहीतर दिगंबर अवस्थेतही असत.जगापासून ते स्वतःला तोडण्याचा प्रयत्न करत असत. भौतिक जगतात त्यांचं मन अजिबात रमत नसे. पण त्यांच्या विक्षिप्तपणाआड एक अतिशय विद्वान दिव्या पुरुष लपलेला आहे. याची जाणीवही हळूहळू होऊ लागली. त्याच्या विकशास्त्र संपन्नतेचा दाखल लोकांनाही मिळू लागला त्यांची तपश्चर्या हि मोठी असल्याची जाणीव लोकांना झाली.

त्याच्यातला योगीही दिसू लागला. तर प्राण्यांची भाषाही या अवलियाला येत होती. हेही लोकांना कळले. त्यांची कीर्ती सगळीकडे पसरू लागल्यानंतर मोठमोठी मंडळी त्यांना भेटायला येऊ लागली. दस्तुरखुद्द लोकमान्यांनीही त्यांची भेट घेतली होती. अकोल्यात शिवजयंती संदर्भात झालेल्या एका सभेला टिळकांबरोबर गजानन महाराज व्यासपीठावर बसले होते.

लोकमान्य आणि अमरावतीचे दादासाहेब खापर्डे समवेत ते अकोल्यातील प्रभू रामचंद्रांरामचंद्रांच्या मंदिरात दर्शनालाही गेले होते. श्री वासुदेवानंद सरस्वती महाराजांना भेटायला शेगावला आले होते. शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील मंडळी महाराजांना भेटायला येऊ लागले. सिध्दयोगी असल्याने अनेक चमत्कारही ते करत.अत्यंत कनवाळू असल्याने कोणाचं दुःख त्यांना पाहवत नसे. खरतर त्यांच्याकडे येणारी गांजलेली मंडळी त्यांना पाहताच आपलं दुःख विसरून जात असत.

लोकांच्या दुःखाची नास त्यांना चांगलीच कळलेली असे त्यामुळे त्यांच्या सल्याने व्यक्तीच भलं झाल्याशिवाय राहत नये. त्यामुळे लोक भक्तिभावाने त्यांच्याकडे येत. महाराजांची कीर्ती पुढे वाढतच गेली. विदर्भात तर घराघरातते माहित होते. पण उर्वरित महाराष्ट्रात आणि शेजारच्या राज्यात हि त्यांची कीर्ती वाढत गेली. विदर्भात तर महाराजांना नैवैद्य दाखवल्याशिवाय न जेवणारी मंडळी आजही आहेत. अनेकांनी त्यांना आपले गुरु मानलेत. व त्यांची पूजा सुरु केली. महाराष्ट्रभर त्यांची मंदिर स्थापली गेली.

महाराजांची कीर्ती वाढत गेल्यानंतर त्यांनी स्वतःच आपल्या शिष्यानं ट्रस्ट स्थापन करायला सांगितले. त्यानंतर मग गजानन महाराज या संस्थान या नावाने १९०८ मध्ये ट्रस्ट स्थापन झाला. या ट्रस्टच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य केली जाऊ लागली. हि कार्य आजही चालू आहेत. हिंदूंच्या अनेक धर्मस्थळी या ट्रस्टच्या उत्तम सुविधा असलेल्या धर्मशाळा आहे.

हे सर्व करत असताना महाराजांचे भौतिक जगातील लक्ष उडून गेले होते. त्यांनी एके दिवशी त्यांनी पंढरपुर आषाढी एकादशीला समाधी घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांच्या या निर्णयाने भक्तांना मोठा धक्का बसला. दुःखाची लाटच पसरली.

भक्तांनी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला.पण महाराज निर्णयावर ठाम होते. त्यांनी समाधीपूर्वी दीड महिना आधी आपल्या मृत्यूचा दिवस आणि वेळ सांगितली होती. शिवाय आपली समाधी कोठे बांधावी हेही सांगितले होते. त्यांनुसार भाद्रपद शुद्ध पंचमीला अर्थात ऋषी पंचमी शके १८३२ गुरुवार दिनांक ८ सप्टेंबर १९१० रोजीचा तो दिवस उजाडला यादिवसावरच काळ सावट होते. दुःखाची सावली जणू पडली होती.

ठरवल्याप्रमाणे महाराजांनी या दिवशी समाधी घेतली. अवघ्या महाराष्ट्राच्या दुःखाला पारावर उरला नाही. भक्तांना सैरभैर झाल्यासारख झालं. जीवनात जणू राम राहिला नाही असा वाटलं. कारण एक चैतन्य अनंतात विलीन झालं होत. त्यांच्या समाधीच्या दर्शनासाठी भक्तांचा सागर शेगावात उसळला.

भक्तच काय महाराजांचं ज्या पशु पक्ष्यांवर प्रेम होत तेहींहि रडत असल्याचं सांगितले जाते. मात्र तिकडे महाराजांच्या मुखावर नेहमीचेच हास्य होत. निर्वाणाला गेलेल्या अवलियाने जाताना मात्र सर्वाना सुखाचा, समाधानाचा आणि मुक्तीचा मंत्र सांगितलं होता.

हा मंत्र होता अर्थातच.गण गण गणात बोते, गण गण गणात बोते…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *