नमस्कार मित्रांनो.. Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! आचार्य चाणक्य यांनी केवळ अर्थशास्त्र , राजकारण याविषयीच सांगितले नाही तर दैनंदिन जीवनातील त्रास टाळण्यासाठी सुद्धा काही उपाय सांगितले आहे मुसद्देगिरीत पारंगत असलेल्या चाणक्य यांनी तुमच्या नीती शास्त्रात शत्रूच्या डावपेचावरून कसे वाचावे आणि ते कोण आहेत ज्यांच्या पासून नेहमी दूर राहावे हे सुद्धा सांगितले आहे.चाणक्य नीती सांगते प्रत्येक व्यक्तीने ३ प्रकारच्या लोकांकडून कधीही मदत मागू नये, कितीही मोठ्या संकटात असाल तरीही या ३ लोकांकडून तुम्ही चुकून सुद्धा मदत मागू नका. कारण हि लोक शत्रूपेक्षा सुद्धा घातक ठरतात. हि लोक शत्रू पेक्षा सुद्धा जास्त धोकादायक असतात. जर एखादी व्यक्ती एखाद्या मोठ्या संकटात सापडली तरीही त्याने या ३ लोकांपासून मदत मागू नये.
कारण या लोकांकडून मदत मागणे म्हणजे आपल्याच पायावर कुऱ्हाड मारण्यासारखे आहे तुमच्या तोंडावर हि लोक तुमच्यासाठी खूप गोड बोलतात , मदत करतोय असे दाखवतात पण शत्रूपेक्षा घातक हि लोक असतात आणि त्यामध्ये सगळ्यात पहिला नंबर लागतो तो म्हणजे स्वार्थी लोकांचा , तुम्हाला सुद्धा अंदाज येत असेल कि तुमच्या आजू बाजूला नक्की स्वार्थी कोण आहे,
चाणक्य नीतीप्रमाणे हि लोक कधीही तुमच्या मदतीला येणार नाही , फक्त मदत करत आहेत असे दाखवतात किंवा जर चुकून माकून तुमची मदत केली तर त्याचा वाईट उपयोग कसा करायचा याचाच ते विचार करतील. स्वतःच्या स्वार्थासाठी ते वेळ पडली तर तुमचे नुकसान सुद्धा करतील. आणि म्हणूनच एखादी व्यक्ती स्वार्थी आहे हे माहित असून सुद्धा त्याची मदत घेऊ नका
त्यानंतर म्हणजे ईर्ष्यावान लोक अर्थात ते इतरांचा मत्सर करतात ती लोक आता हि लोक कोण आहेत आणि ओळखायची कशी कारण हि लोक तुमच्यासाठी गोडच बोलतात पण मनातून मात्र ते तुमचा द्वेष करतात मत्सर करतात , त्यांच्या वागण्या बोलण्यात चेहऱ्यावरच्या भावातून किंवा त्यांच्या कृतीतून तुम्हाला नक्कीच जाणवेल ,
यांनी कितीही मदत करण्याचा आव आणला तरीही त्यांच्या भावना यांच्या कंट्रोल मध्ये नसतात आणि त्यामुळे अशा व्यक्ती दुसऱ्याचे नुकसान च करतात.यांनतर आहे रागीट व्यक्ती , या व्यक्तींचे जर स्वतःच्या रागावर नियंत्रण नाही अशांची मदत तुम्ही चुकून सुद्धा घेऊ नका कारण अशी अनियंत्रित व्यक्ती तुमचा त्रास कमी करण्याऐवजी वाढवेल अशा व्यक्तीशी मैत्री आणि वैर दोन्ही करू नका
अशा लोकांना परिस्तिथी हाताळता येत नाही स्वतःच्या रागावर नियंत्रण राहत नाही आणि मग रंगाच्या भरात ते तुमचा अपमान करायला सुद्धा मागेपुढे बघत नाही आणि तुम्ही त्यांची मदत घेतलेली असते त्यामुळे तुम्हाला प्रतिउत्तर सुद्धा करता येत नाही म्हणूनच अति रागीट व्यक्तींची मदत घेऊ नये
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!